**
अकोट तालुका
प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील सातपुड्यात वसलेलं ग्राम सुकळी या छोट्याशा गावांमधील वेदांत गंगाधर गावंडे या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत ८८% टक्के गुण मिळवून तालुक्यातील ग्रामीण भागामधून भरारीचि मजल मारली आहे.
नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला व या निकालांमधून श्री नरसिंग महाविद्यालय अकोट चा विद्यार्थी वेदांत गंगाधर गावंडे या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेमधून ८८% टक्के गुण मिळून तेही स्वकर्तृत्वावर व कुठल्याही प्रकारचे कोचिंग क्लास न लावता मॅथेमॅटिक्स मध्ये १०० पैकी ९६ गुण तर बायलॉजी विषयामध्ये १००पैकी ९४ गुण मिळवत त्याने दाखवून दिले की, आपल्या गरीब परिस्थितीचे जाणीव ठेवल्यास, चिकाटीने व जिद्दीने अभ्यास केल्यास चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो. व त्याने ते सिद्ध करून दाखविले त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक,अभिनंदन होत आहे व त्याच्यावर प्रोत्साहनाचा वर्षाव होत आहे.
वेदांत हा विद्यार्थी यशस्वी होण्याचे श्रेय आपले आई-वडील, श्री नरसिंग महाविद्यालयाचे प्रा.शिक्षक वृंद व कर्मचारी व सभोवताली मित्रमंडळी यांना देत आहे.



