प्रभाग क्र. ५ मध्ये पाण्यावरून संतापाचा स्फोट
नागरिकांचा नगरपालिकेला आंदोलनाचा इशारा
मुर्तीजापूर प्रतिनिधी :
शहरातील प्रभाग क्र. ५ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून मोठा वाद उभा राहिला असून नागरिकांनी थेट नगरपालिकेकडे धाव घेतली आहे. हैदराबादची एका संस्थाने “गरीबांना प्रभाग क्रमांक पाच मध्ये एक बोरवेल आणि आर.ओ दिला होता. संस्थांनी नागरिकांकडून एका एग्रीमेंटवर स्पष्ट लिहून घेतला होता की बोरवेल चा पाणी आरोद्वारे निशुल देण्यात येत असून आर.ओ मध्ये काही बिघाड आल्यास सगळे मिळून दुरुस्त करतील. किंतु आर.ओ चा पाणी मोफत मिळणारे पाणी बंद करून आता पैशाने पाणी विकले जात आहे,” असा गंभीर आरोप करत संतप्त नागरिकांनी २५ मे २०२६ रोजी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले.
निवेदनानुसार, सन २०१९ मध्ये नरेश भोजने व त्यांच्या पत्नी शुभांगी भोजने यांनी परिसरातील नागरिकांना .
विशेष म्हणजे, दररोज २५ ते ३० टाक्यांप्रमाणे पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे “सामान्य नागरिकांच्या हक्काच्या पाण्यावर व्यवसाय सुरू झाला का?” असा प्रशन परिसरातून उपस्थित केला जात आहे.
या प्रकारामुळे वॉर्डातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून नगरपालिकेने आणि संबंधित नगरसेवकांनी तात्काळ पाहणी करून, न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
सदर निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून आता नगरपालिका प्रशासन या गंभीर प्रकरणात कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



