मूर्तिजापूर ता.प्रतिनिधी
मुर्तीजापुर शहराकडे व्यास हॉटेल पासून आत मध्ये येणारा रस्ता अत्यंत दैनिय अवस्था झाली असून मोठे मोठे खड्डे या मार्गावर निर्माण झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग हे शहरा कडे येणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे
आचारसंहितामध्ये योगी आदित्यनाथ आगमन प्रसंगी एकच दिवसाच्या आधीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्याची डाग डुगी करून रस्ता तयार करण्यात आलेला आहे राजकीय सहकार्याची भूमिका ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता का तयार केला यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे सार्वजनिक अभियंता कनिष्ठ अभियंताची चौकशी करून निलंबनाची कारवाई व्हावी ही अपेक्षा जनता निवडणूक आयोगाकडून ठेवत आहे निवडणूक आयोगाने आतापर्यंत आपली भूमिका यावर स्पष्ट का केली नाही यावरूनही जनतेची नाराजी दिसून येत आहे चुकी व तक्रारीमुळे पोलीस महासंचालकाची तडकाफडकी बदली करून कारवाई करण्यात आली आहे अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सुद्धा या विषयाकडे गंभीरताने लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे तर दुसरीकडे मुर्तीजापुर शहरा कडे येणारा या रस्त्यावर जिव घेणारा मोठे मोठे खड्डे दिसत आहे राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला रस्ता अपघाताला कारणीभूत ठरत आहे या ठिकाणी मोठा अपघात सुद्धा होऊ शकते अनेकांचे प्राण सुद्धा जाऊ शकते तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याबद्दल कुंभकर्णाची झोप घेत आहे या सर्व प्रकरणाची चौकशी करून मूर्तीच्या पुढचे कारणीभूत असलेल्या अभियंता यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी सुद्धा जोर धरत आहे हे रस्ता कधी तयार होणार असाही प्रश्न या भागातील येना जाण्या करणारे वाहनधारकांनी केलेला आहे या मार्गावर अनेक शेतकऱ्यांचे शेत असून शेतकऱ्यांना जावे लागते परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेला आहे


