मूर्तिजापूर -दहावे एक दिवसीय राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन,मूर्तिजापूर येथे नुकतेच आनंद व उत्साहात संपन्न झाले.
मूर्तिजापूर ता.प्रतिनिधि
तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटी, अकोला व सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर व्दारा आयोजित भगवंत लॉन सभागृह मूर्तिजापूर येथे संपन्न झालेल्या या संमेलनाची सुरुवात,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्ज्वल करून करण्यात आली.मान्यवरांच्या स्वागत सत्कारानंत,उद्घाटक मा.प्रवीण नागपुरे,अतिथी डॉ.श्रीकांत तिडके,डॉ.अशोक इंगळे,ॲड.निता कचवे,मा.शंकर घोरसे,मा.अविनाश बेलाडकर,डॉ.तुषार बायस्कर,
मा.गणेश भाकरे यांनी आपले विचार मांडले.संमेलनाध्यक्षा डॉ.मंदा नांदुरकर यांनी,साहित्य व तंत्रज्ञानाच्या सोबतीने होणारा प्रवास हा अधिक सुखकर राहिल,असे अध्यक्षीय भाषणातून नोंदवले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र जवादे यांनी तर आभार प्रमोद पंत यांनी मानले,अंबेचरण ननीर यांनी सुंदर सुत्र संचालन केले.
यानंतर हास्य बळी डॉट कॉम या किशोर बळी यांच्या कार्यक्रमाने उपस्थितांना हास्यातून आनंदित केले. रंगलेले निमंत्रित कवींचे कविसंमेलन,दाद दयायला लावणारा गझल मुशायरा,रंगकवितेचे हे सन्माननिय कवींचे संमेलन व भावपूर्ण असा समारोपीय कार्यक्रम,अशा सत्रांमधून हे संमेलन स्मरणीय ठरले.
ढगोबाचे ढोल,संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचे करूणाष्टक,येता जाता व स्मृतिगंध या पुस्तकांचे, या सोहळयात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.शेंद्रीय शेती करणाऱ्या हातगाव येथील स्वावलंबी शेतीगटाचा सन्मान करण्यात आला.रसिक श्रोत्यांची भरगच्च उपस्थिती या संमेलनात उल्लेखनिय ठरली.
या संमेलनाच्या आयोजनात रवींद्र जवादे,प्रमोद पंत,विलास वानखडे,सुनिल ढोकणे,किशोर आष्टीकर,शैलेश गिरी,विनोद महल्ले,मीना जवादे,निलीमा आष्टीकर,प्रा. योगिता चिंचे,प्रा.वर्षा कावरे, रामकृष्ण आसरे,ज्ञानदेव भड,विलास निलखन आदी सर्व आयोजकांचे सहकार्य लाभले.






